Akshaye Khanna : 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांनी सांगितलं अक्षय खन्नाने सिनेमा सोडण्याचं कारण; म्हणाले, 'धुरंधरचं यश त्याच्या डोक्यात...'

Drishyam 3 Producer On Akshaye Khanna : अक्षय खन्नाने 'दृश्यम ३' सोडला अशा चर्चा होत्या. आता सिनेमाच्या निर्मात्यांनी यावर मौन सोडलं असून अक्षयने सिनेमा सोडण्याचं कारणही सांगितलं आहे.

Akshaye Khanna : 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांनी सांगितलं अक्षय खन्नाने सिनेमा सोडण्याचं कारण; म्हणाले, 'धुरंधरचं यश त्याच्या डोक्यात...'
Google

Drishyam 3 Producer On Akshaye Khanna : अक्षय खन्नाने 'दृश्यम ३' सोडला अशा चर्चा होत्या. आता सिनेमाच्या निर्मात्यांनी यावर मौन सोडलं असून अक्षयने सिनेमा सोडण्याचं कारणही सांगितलं आहे.

मुंबई - अजय देवगणचा 'दृश्यम ३' हा चित्रपट जाहीर झाल्यापासून सतत चर्चेत आहे. चित्रपटातील कलाकारांची सर्वाधिक चर्चा झाली आहे. दरम्यान, अक्षय खन्नाने चित्रपट सोडल्याच्या अफवा पसरल्या होत्या. आता 'दृश्यम ३' चे निर्माते कुमार मंगत यावर भाष्य करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.


निर्माते कुमार मंगत यांनी 'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अक्षय खन्नाने 'दृश्यम ३' का सोडला याबद्दल भाष्य केलं आहे. ते अभिनेत्याविरुद्ध खटला दाखल करण्याची योजना आखत आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

कुमार मंगत यांनी सांगितलं की, त्यांनी अक्षय खन्नासोबत करार केला आहे. अनेक चर्चेनंतर त्याचं मानधन देखील निश्चित करण्यात आलेलं. त्यानं विग घालण्याचा आग्रह धरला. पण दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी सांगितलं की, हे व्यावहारिक ठरणार नाही, कारण 'दृश्यम ३' हा चित्रपटाचा सिक्वेल आहे आणि त्यामुळे कथेच्या सातत्यतेत अडथळा येईल. अक्षयने त्यांचा मुद्दा समजून घेतला आणि त्याची मागणी मागे घेण्यास तयार झाला. पण, त्याच्या आजूबाजूच्या काही लोकांनी त्याला सल्ला दिला की विग घातल्यानं तो अधिक स्मार्ट दिसेल. म्हणून त्याने पुन्हा तीच विनंती केली. अभिषेकने सहमती दिली आणि त्याच्याशी या विषयावर चर्चा करण्यासही तयार झाला. पण नंतर त्यानं आम्हाला सांगितलं की, तो सिनेमात काम करणार नाही.

कुमार मंगत पाठक यांनी सांगितलं की, एक काळ असा होता जेव्हा अक्षय काहीच नव्हता. त्या काळात मी त्याच्यासोबत 'सेक्शन ३७५' (२०१९) बनवला. तरीही, त्याच्या अनप्रोफेशनल वागणुकीमुळे अनेकांनी आम्हाला त्याच्यासोबत काम करण्यास नकार देण्याचा सल्ला दिला. सेटवरचा त्याचा दृष्टिकोनही खूपच वाईट आहे. 'सेक्शन ३७५' ने त्याला ओळख मिळवून दिली. नंतर, मी त्याला 'दृश्यम २' (२०२२) साठी साइन केलं. 'दृश्यम २' नंतरच त्याला सर्व मोठ्या ऑफर्स मिळाल्या. त्याआधी तो ३-४ वर्षे घरीच होता.

'धुरंधर' हा चित्रपट अक्षय खन्नामुळे चालला नाही


कुमार मंगत पुढे म्हणाले, 'अजय देवगण दृश्यम फ्रँचायझीमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. 'छावा' हा विकी कौशलचा चित्रपट आहे, ज्यामध्ये अक्षय देखील आहे. 'धुरंधर' लाही हेच लागू होतं. 'धुरंधर' हा रणवीर सिंगचा चित्रपट आहे. जर अक्षयने हा चित्रपट एकट्याने बनवला असता तर तो भारतात ५० कोटी रुपयेही कमाई करू शकला नसता. आयुष्यभराचं कलेक्शन सोडून द्या. जर त्याला वाटत असेल की तो सुपरस्टार झाला आहे, तर त्याने स्टुडिओसह सुपरस्टार बजेट असलेला चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करावा. मग आपण पाहू की त्याच्या इतक्या मोठ्या बजेटच्या चित्रपटाला कोण प्रतिसाद देईल. काही कलाकार मल्टीस्टारर चित्रपट करतात आणि जेव्हा ते चित्रपट हिट होतात तेव्हा ते स्वतःला स्टार मानतात. त्याच्यासोबत नेमकं हेच घडलं. त्याला वाटतं की तो आता एक सुपरस्टार आहे. यश त्याच्या डोक्यात शिरलं आहे. तो आम्हाला म्हणाला, 'माझ्यामुळे धुरंधर चालतोय'